'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 20 March 2012

शून्याची गोष्ट

'शाळा' सिनेमा पाहिला. शाळेची खूप खूप आठवण झाली. किती किती गोष्टी आठवल्या. वाटलं, लिहून ठेवल्या पाहिजेत सगळ्या. पण म्हटलं नको. आपली अब्रू जाईल. पण मागून विचार केला, जाईना का. आपण कोण थोर आहोत असे? एक आठवण लिहून ठेवली. योगायोगानं आमच्या शाळेचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आलं. माझा बालमित्र तिथंच शिक्षक झालाय. त्यानं त्यानिमित्तानं प्रकाशित होणा-या स्मरणिकेबद्दल सांगितलं. म्हटलं, 'मी एक छोटा लेख लिहिलाय. पण तुमच्या चौकटीत बसणार नाही. उगीच दोघांचीही लाज कशाला वेशीवर टांगा'.. तर म्हणाला, 'दे तर खरं'. दिला. त्यानं छापला.
सिनेमाच्या शेवटी जोश्या म्हणतो, 'नववी संपली आता दहावीचं भयाण वर्ष..' याच वर्षाची ही गोष्ट...

ही गोष्ट सांगितलीच पाहिजे. किमान दहावीतल्या विद्यार्थ्यांना. ज्यांना गणित म्हणताच पोटात गोळा येतो त्यांना. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना.
तर ऐका..