'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday 14 July 2013

जगायला शिकवणारा देव

वारकऱ्यांचा देवच मुळी समताबंधुतासमन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहेपंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणाराबंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथहा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.


चैत्र-वैशाखी उन्हाच्या रणरणत्या लाह्या रानभर फुटत असतात. आभाळाकडं तोंड करून तापत पडलेल्या रानाची तगमग-तगमग होत असते. एका दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटतो. पालापाचोळा गोल गोल फिरत आभाळात जातो. कुठल्याशा कोपऱ्यातून एकेक ढग जमा होतो. त्यांचं क्षणात पांढऱ्यातून काळ्यात रुपांतर होत राहातं. चकीत होऊन पाहणाऱ्या रानाच्या अंगाखांद्यावर टप् टप् करत वळवाचे टप्पोरे थेंब पडतात. त्या थंड स्पर्शानं रान शहारतं. धारा नेम धरून बरसू लागतात. बघता बघता ढेकळांचं लोणी होतं. शेता-बांधातून लाल-तांबडं पाणी खळाळू लागतं. झाडं झडझडून अंगावरचं पाणी झटकतात. अन् सृष्टी ताजीतवानी होऊन जाते...

हळू-हळू कड्या-कपारीच्या आडून पोपटी कोंब डोकावू लागतात. ज्येष्ठ-आषाढाची हिरवाई रानावर दिसू  लागते. अशा वेळी या हिरव्या रानात दूरवर एक पांढरा ठिपका दिसतो. एका ठिपक्याचे दोन, दोनाचे पाच, पाचाचे दहा ठिपके होत होत ठिपक्यांची लांबच लांब रांग हळू हळू जवळ येते. टाळ-मृदुंगाचा आवाज मोठा होत जातो. कपारीआडून बाहेर डोकावू लागलेली कोवळी पानं टाळ्यांचा ताल धरतात. मृदुंगाच्या धुमाळीवर रस्त्याकडेची झुडपं अंग घुसळू लागतात. ''वारी आली..माऊली आली..पालखी आली...'' वाटेवरच्या गावात चैतन्य जागतं. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला झुंबड उडते...

कशी येईना मरी, गं या संतांवरी...

अस्सल मऱ्हाटी भाषा अनुभवायची असेल तर संतांचे अभंग वाचावेत. थेट. तीक्ष्ण. परखड. त्याहूनही अधिक जिवंत भाषा आहे, या संतांच्या बायकांची.. त्यांचे अभंग वाचणे हा एक रसरशीत अनुभव...


ज्येष्ठाच्या पावसाची ओल अंगाला लागली की मातीच्या पोटात झोपलेली बी-बीयाणं जागी होतात. आषाढाची चाहूल घेत त्यांचे हिरवे कोंब डोकं वर काढतात. हळू हळू साऱ्या रानाला हिरवा गहिवर येतो न् मग या दगडांच्या देशाला पिसं भरतं. खुळावलेली पावलं नकळत पंढरीची वाट चालू लागतात. 'उभारोनी बाहे' त्यांना 'पालवणारा' विठोबा आणि त्याच्या भेटीसाठी आतूर झालेले भक्त. दोघेही वेडेपिसे! हे वेड शतकानुशतकांचं. दर आषाढीला असं परस्पर प्रेमाचं भरतं येतं. 
कुणी मायबाप म्हणावं, कुणी सखा, कुणी सोयरा, कुणी बंधू, कुणी चुलता, कुणी गुरू...ज्याला जे वाटेल त्यानं ते नातं लावावं. वाटेनं चालताना या सगळ्यांचं मिळून एक नातं बनतं. ते म्हणजे, 'माऊली'! वारकऱ्यांनी याच नावानं एकमेकांना संबोधावं. याच नावानं झोपेतून जागं करावं. याच नावानं घासातला घास द्यावा. हेच नाव घेऊन थकले भागलेले पाय चेपून द्यावेत आणि 'माऊली माऊली' म्हणतच परस्परांच्या न् विठुरायाच्या पायावर मनोभावे डोकं ठेवावं...

उंचनिंच कांही नेणे भगवंत

मऱ्हाटी मुलुखातली माणसं 'वारी' का करतातत्यांना त्यातून काय मिळतंत्यांचा देव त्यांना देतो तरी कायअसे प्रश्न विचारले जातातच. फार शोधावं लागणार नाही. सोपं आहे. कुठल्याही संताचा एखादा अभंग वाचून पाहावा. उत्तर मिळतं.


जमाना माध्यमांचा आहे. माहितीच्या विस्फोटाचा, स्पर्धेचा आहे. सध्या पंढरीची वारी सुरू आहे. गावागावांतून निघालेल्या जथ्थ्यांचा आता गर्जणारा, उचंबळणारा भाविकांचा विराट ओघ बनला आहे. या आधुनिक युगात दुर्मिळ झालेली धोतर, लुगडी.., डोई, खांद्यावर हेलकावत निघालेली बोचकी.., निब्बर अनवाणी पावलं.., भाबडे चेहरे शूट होतायत. आभाळाकडं तोंड केलेल्या 'ओबी व्हॅन्स' काही सेकंदात त्यांना 'ऑन एअर' करतायत. टीव्हीवर हा 'लाईव्ह' सोहळा पाहताना घरोघरी भक्तीभाव दाटून येतोय. पाठीला सॅक अडकवून आपल्या इंडियन फ्रेन्डस् सोबत वारीत सहभागी झालेल्या फॉरीनर्ससाठी तर ही नवलाईच...   

Friday 12 July 2013

माणूस माझे नाव

विदर्भ आणि तिथल्या माणसांवर 'भारत4इंडिया.कॉम'साठी ब्लॉग लिहिला. तोच इथं कॉपी पेस्ट करतोय. सोबतचं चित्र आहे, आमचे विदर्भातलेच स्नेही सुनील यावलीकर यांचं...

दिवस नाताळाचे आहेत. हवेत गारठा आहे. खिडकीतून कोवळी उन्हं आलीयेत. टीव्हीला चिकटलेला पोरगा काही तरी खाता खाता भरभर चॅनेल्स बदलतोय. लाल डगला घातलेला, पांढऱ्या दाढीवाला सांताक्लॉज, माणसांचं जग सुखी करायला स्वर्गातून आलेले देवदूत, हॉलीवूड सिनेमांचे कॉपी केलेले हिंदी सिनेमे तुकड्या तुकड्यांनी टीव्ही स्क्रीनवरून सरकतायत. मी खिडकीतून बाहेर बघू लागतो. शाळेच्या पुस्तकातल्या नाताळाच्या गोष्टी आठवू लागतात. त्यात रशियन, जपानी, युरोपियन... सगळे देवदूत गरिबांच्या जीवनात आनंद फुलवायला आलेले असतात...