'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 17 March 2011

अनुभव

आयुष्यातला एक योगायोग असा की पत्रकारितेच्या एवढ्याशा आयुष्यात मराठीतले नामवंत संपादक 'बॉस'  म्हणून अनुभवले. कुमार केतकर, अरूण टीकेकर, निखिल वागळे, भारतकुमार राऊत, विजय कुवळेकर, यमाजी मालकर आणि थोर पत्रकार अनंत भालेराव यांचे चिरंजीव, निशिकांत भालेराव. तुमचा आजचा अग्रलेख काही धड नाही, असं बिनदिक्कत तोंडावर सांगणा-या आपल्या रिपोर्टरशी भालेराव अत्यंत शांतपणे चर्चा करायचे. रंग दे बसंतीसिनेमा पाहून आल्यावर मी उस्फूर्तपणे सकाळच्या पुरवणीत अनुभव लिहिला. तो वाचून काही न बोलता यांनी नोटीस बोर्डावर चांगलं लिहिल्याबद्दल लेखी कौतुक केलं होतं. तोच हा अनुभव...

कृपया फोटोवर क्लिक करा


No comments:

Post a Comment