'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday 21 August 2011

नातं गांधी टोपीचं

120 वर्षांच्या इतिहासात मुंबईतल्या डबेवाल्यांनी परवा पहिल्यांदाच काम बंद आंदोलन केलं. हे आंदोलन होतं, अण्णांना पाठींबा देण्यासाठी. अण्णा आणि डबेवाल्यांमध्ये एक नातं आहे. गळ्यातल्या तुळशीमाळेचं, गांधी टोपीचं आणि अविरत जनसेवेचं.
यानिमित्तानं आठवलं, पुण्या-मुंबईचं, डबेवाल्यांचं हातातोंडाचं नातं. सुचलेला विषय 'लोकमत'च्या पुरवणीचे संपादक प्रदीप निफाडकरांना सांगितला. त्यांनी तो समूहसंपादक अरुण टिकेकरांना सांगितला. टिकेकर मुंबई-पुण्याच्या इतिहासात रमणारे. चटकन् हो म्हणाले. आणि 'लोकमत'च्या १६ नोव्हेंबर २००३ च्या 'मंथन' या रविवार पुरवणीच्या पहिल्या पानावर 'मुंबईकरांसाठी पुणेकर डबेवाले' नावाचा माझा दणका लेख छापून आला.


                        (कृपया फोटोवर क्लिक करा)

No comments:

Post a Comment