'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 22 August 2011

काही माणुसकी आहे की नाही?

मावळात गेल्या आठवड्यात आंदोलन करणा-या तीन माणसांना पोलिसांनी गोळ्या घातल्या. त्यावरून आठवलं. २००२मध्ये पुण्यातल्या मावळ भागात बिबळ्यांचा मोठा उपद्रव सुरू झाला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनानं उपाय काय केला तर, बिबळ्यांना गोळ्या घालणं! मानवी वस्तीच्याच आस-यानं राहणारे बिबळे म्हणाले असतील, 'अरे, या माणसांना काही माणुसकी आहे की नाही?' 
तर 'आज बिबळ्यांना घालतायत, उद्या इथल्या माणसांनाही गोळ्या घालतील', असं मी म्हणालो. दुर्दैवानं ते खरं झालं. बिबळ्यांच्या या शिरकाणावर मी एक लेख लिहिला आणि मुंबईला 'महाराष्ट्र टाइम्स'ला फोन केला. तिथं होते, आल्हाद गोडबोले. ते म्हणाले करा फॅक्स. केला. ८ सप्टेंबर २००२च्या रविवारच्या 'संवाद' पुरवणीत तो छापून आला.

                                                       (कृपया फोटोवर क्लिक करा)

काही वर्षांपूर्वी पुण्यातून महाराष्ट्र 'टाइम्स'ची 'अविष्कार' नावाची पुरवणी निघत असे. त्यात मी लिहित असे. बिबट्यांच्या प्रश्नावरचाच हा एक लेख. 

                                                          (कृपया फोटोवर क्लिक करा)

                                                           

No comments:

Post a Comment